Posts

Showing posts from 2015

अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी...

कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्याखालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. पैकी नाटके आणि सिनेमे हल्ली डायरेक्ट टू होम शैलीत घरपोच होत असल्याने औटडोअर मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणजे कविसंमेलनाला जायचे अशीच महाराष्ट्रभर रसिकांची कल्पना झालेली असते. खरंतर औटडोअर मनोरंजनाच्या क्षेत्रात सगळ्यांत पहिला नंबर निवडणुकीतल्या भाषणांचा असतो, मात्र हल्ली एकमेकांची सरकारे ‘पाडणे’ वगैरे दहाबारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले खेळ कॉंग्रेस सरकारच्या - नवी पिढी ज्या चिवटपणाने फेसबुकला अष्टौप्रहर चिकटून बसते तसल्या- सत्तेला घनदाट चिकटपणे चिटकून राहण्याच्या गुणधर्मामुळे फारसे घडताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभांच्या गंमतीदार निवडणुका लैच लै तर चार-पाच वर्षांत एखाद-दुस-याच वेळी ‘लागतात’. स्थानिक नगरपालिकांच्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही विनोदी असतातच पण तिथल्या विनोदाला उघडपणे हसायचे म्हणजे हसणा-यावर दणकावून मार खायचीच पाळी असते. सबब सर्वाधिक निरुपद्रवी औटडोअर मनोरंजनासाठी लोकांना कविसंमेलनावरच अवलंबून राहावे लागते. सांप्

व्यथांच्या जळत्या रांगोळ्या..

गोष्टी किती साध्या असतात आणि कुठल्या कुठे जाऊन भिडतात. चपलेचा पट्टा शिवून घेणा-या मित्राला म्हटलं, “ नवी घे की आता चप्पल. शिवण्यासारखं काय उरलंय याच्यात? ” मित्र म्हणाला, “ घेतो.. घ्यायचीयच.. जरा पाऊसपाणी पडू दे. दुष्काळात नवी चप्पल घेऊन काय करू? ” क्वचित पिणारा, पण सहसा कधी आरडाओरडा न करणारा शांत स्वभावाचा गल्लीतला माणूस नेमाने संध्याकाळी बायकोला शिवागाळ करायला लागला. एका सकाळी मी विचारलं, “ वहिनी, भाऊ जरा कालवा करत होता रात्री. काय झालं होतं? ” वहिनी समजूतदारपणे म्हणाल्या, ‘काय नाय हो, ह्ये पाऊसपानी पडंना, त्याच्यानी डोस्कं चिनभिन व्हायलंय त्येंचं. येरी आमचे मानसं कालवा करना-यापैकी न्हवंत.. ह्या वावराच्या इचारानं काहूर उटायलंय उरात त्येंच्या.. ” गोष्टी किती अवघड असतात आणि किती निर्दयपणे जगण्याला भिडतात ? पेरणी झालीय किंवा व्हायचीय आणि पाऊस पडत नाहीय, तेव्हा अशी साध्या साध्या सुखांना मारत राहतात माणसं. चप्पल ही काही फार महाग गोष्ट नसते. दोन-चार महिने पायांचा सांभाळ करू शकेलशी स्लीपर साठ-सत्तर रुपयांना मिळते आणि दीड-दोनशे रुपयांपर्यंत ब-यापैकी चप्पल मिळू शकते

या रिकामपणाचं करायचं काय ?

“ काय मग बंटीशेठ, लागल्या सुट्ट्या ? ” “ लागल्या की ! ” “ मग आता काय मामाच्या गावाला जाणार ? ” “ मामाच्या गावाला ? हे हे हे.. “ बंटी खळखळून हसला. “ लहानंय काय मी आता, सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायला ? ” “ मग काय प्लान सुट्टीचे ? ” “ प्लान कसले करणार ? सकाळ संध्याकाळ इथंच गावात इकडं तिकडं करायचं, दुपारी शेतात जायचं.. ” “ शेतातली कामं करतोस तू ? ” “ न करून सांगतोय कुणाला ? दादाच्या किरकिरीपेक्षा शेतात जाणं परवडतं.. काम असू, नसू.. ” “ किरकिर करतात दादा ? का ? ” “ ’ गावात बोंबलत हिंडू नकोस’ म्हणतात.. ” “ गावाला हिंडायचंच कशाला पण ? काही वाचन लेखन करावं, काही खेळावं .. ” “ काय वाचणार इथं आपल्या गावात ? रोजच्या पेपराशिवाय आहे काय इथे वाचायला ? ” “ तेही खरंच ! बाकीची मुलं काय करतात मग गावातली आपल्या, अशा सुट्ट्याबिट्ट्यांच्या दिवसात? ” “ तुम्ही करायचा तेच ! ” बंटी पुन्हा हसला. बंटीचं उत्तर ऐकून मी बराचसा ओशाळलो. कॉलेज चालू असताना सुट्ट्यांची परोपरीने वाट बघणारे आम्ही, प्रत्यक्षात सुट्ट्या लागल्यावर चार-दोन दिवसांतच वै