Posts

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..

एक महेंद्र आहे, आणि एक माया. महेंद्रच्या नावात फार काही विशेष नाही, पण माया म्हणजे ‘माया’च! मायेत एकदा गुरफटलं की काही खरं उरत नाही. भोवतालातलं सगळं जग विलक्षण मोहमयी होऊन जातं. त्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर जीव जडून बसतो, आणि तो तिथून निघता निघत नाही. असा जोरकस दिललगाव असा जीव जीवात रुतून बसलेला काही काळ सरतो आणि मग एखादं वळण असं येतं, महेंद्रला मायेपासून वेगळं व्हावं लागतं. वेगळं म्हणजे लौकिकार्थाने वेगळं. जगरहाटीमुळे वेगळं. माया एवढी मनस्वी असते कि तिला कायम चिमटीत पकडून ठेवणं महेंद्रला अशक्य असतं आणि तिला सोडून देणंही. म्हणजे तिच्यापासून दूर गेला तरीही त्याला तिच्यापासून दूर जाता येत नाही. आणि माया एवढी मनस्वी आहे की महेंद्रला सोडून गेली तरी महेंद्रला ‘सोडणं’ तिला शक्य होत नाही. तरीही, महेंद्र आता तिचा उरलेला नाही, त्याच्या आयुष्यात एक ‘सुधा’ आलेली आहे. महेंद्र आणि मायाने एकमेकांना स्पर्श करण्याच्या दरम्यान एक अदृश्य काचेरी भिंत निर्माण झालीये, ज्याच्यातून ते दोघेही एकमेकांच्या देहा-आत्म्याला सतत दिसत, भासत, जाणवत राहतात, पण त्यांना एकमेकांना स्पर्श नाही करता येत. तगमग तगम...

गांधारी: गावाच्या उध्वस्तीकरणाची गोष्ट.

गोष्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या मधून कुठून तरी चालू होते. भारत स्वतंत्र होऊन काही महिने झाले आहेत, असं आपण म्हणू शकतो, पण हे स्वातंत्र्य सगळ्या भारताच्या पदरात आलेलं नाहीय अजून. उदाहरणार्थ हैदराबादची निझामी अजून संपलेली नाही. दिवा विझण्याआधी भडकतो, तसलं काहीतरी चालू आहे अजून निझामीमध्ये. लोक भेदरलेले आहेत गावोगावचे. कुठून कधी रझाकारी टोळ्या येतील आणि गाव घरदार लुटून घेतील, बाप्यांना जिवे मारतील, बायांना बाटवतील, याचा अजिबात नेम नाही. लोक धास्तावून रानाशेतातसुद्धा जाईनासे झाले आहेत.  घरदार-पैसाअडका लुटला जात असेल, तरी एकापरीने कुणी सहन करील. पण तरण्याबांड बायांना उचलून नेतात. नागडं करून अब्रू लुटतात. कुठल्याशा जुम्मा मशिदीसमोर कितीतरी लोकांना छळ करून खलास करतात. अहमद घाउस नावाचा कुणी ठाणेदार आहे अजिंठ्याला, त्याने तिथे पळवून आणलेल्या बायकांचा जनानखानाच उघडलेला आहे. असलं काही काही कानांवर येत असेल तर माणसांनी धास्तावून जाऊ नये, तर काय व्हावं? अजिंठ्याच्या डोंगरातलं दोन अडीच हजार वस्तीचं एक चिमूटभर गाव आहे. म्हणजे फारतर शेचारशे घरांचं. पुरातन वहिवाटीप्रमाणे शेती कसून उदरनिर्वाह करणारं ग...

बाप घर के दरख़्त होते हैं..

- दिवस आहे की रात्र आहे की काय आहेय आत्ता? दिवस - रात्री - प्रहरांचे हिशेब नष्ट होऊन गेले आहेत मेंदूमधून. काही आवाज येतायत. कुणी धडपडल्याचे, कुणी दटावत असल्याचे. कुणी शिव्याही देत आहे का? माझे डोळे उघडता उघडता नाहीयत. दोन रात्री आणि दोन दिवस आणि पुन्हा ही आताची अर्धी रात्र असा जवळजवळ पन्नाससाठ तास मी नीट झोपलेलो नाही. आत्ता हे आवाज येतायत तर ते फार अस्पष्टपणे मेंदूपर्यंत पोहचतायत, जवळपास काहीतरी घडतं आहे, असं फार धूसरधूसर जाणवतं आहे, आटोकाट प्रयत्न करून मी माझे डोळे ताणून उघडायचा प्रयत्न करतो, पण डोळ्यांतून, मस्तकातून जणू गरम वाफारे ओसंडत आहेत, पराकाष्ठा करूनही देहामनामेंदूमध्ये भिनलेला थकवा झोपल्या जागेवरून उठू देत नाही. मी दमलो आहे अतिशय. जणू छातीवर, डोळ्यांच्या पापण्यांवर अपरिमित जडशीळ ओझं लादलं आहे. आटोकाट प्रयत्न करूनही पापण्या वर उचलल्याच जात नाहीयेत. निद्रा-जागृतीच्या ऐलपैल झगड्यात शेवटी झोप माझ्यावर मात करते. कानांवर आदळणारे धडपडण्याचे, दटावण्याचे, ओरडण्याचे सगळे आवाज झुगारून देऊन मी पुन्हा कधी झोपी जातो, मला अजिबात कळत नाही. प्रचंड दमून रात्री बाराएक वाजता गाडीत येऊन ...

बोलबच्चन ते अबोलबच्चन

शाहरुख खानची एक मुलाखत पाहत होतो. त्यात तो म्हणाला, मुझे कभी भी नही लगा था की मै स्टार बन जाउंगा. मुझे लगता था की मेरी सूरत हीरो जैसी नही है. लेकीन मै खुशकिस्मत था के जब मै फिल्मो मे आया तो जमाना बदल रहा था और बदलते जमाने की मांग शाहरुख खान थी. ‘देखणा चेहरा’ हेच एकेकाळी चित्रपटात हीरोगिरी करण्यासाठीचं महत्वाचं भांडवल मानलं जाई. शाहरुखकडे ते नव्हतं. तरीही तो मागच्या पंचवीस वर्षांतला सर्वात मोठा यशस्वी स्टार झाला. हे स्टारपद त्याला मिळण्यामागचं महत्वाचं कारण होतं – बदलत असलेला काळ. ‘शक्तीमान नेता आणि सुपरस्टार अभिनेता हे काळाचं अपत्य असतं’ असं एक सर्वमान्य विधान आहे. प्रत्येक बदलत्या काळाचं स्वत:चं असं एक ‘स्टेटमेंट’ असतं. हे ‘स्टेटमेंट’ ज्यांना सशक्तपणे करता येतं, ती माणसे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमिताभ बच्चन होतात. हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात असं ‘सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट’ सर्वाधिक प्रभावीपणे करून दाखवणारं कदाचित एकच नाव असू शकेल - अमिताभ बच्चन! शहेनशहा. स्टार ऑफ द मिलेनिअम. जगातलं कुठलंही ‘सुपरलेटिव्ह’ बिरूद आणा. अमिताभ बच्चनला ते सार्थपणेच शोभून दिसतं.  ...